दापोली-दाभोळ
रस्त्यावर दापोलीपासून तीन किमी. वर निगडे फाटयापाशी डावीकडे
वळून आतमध्ये 3 किमी. वर वळणे हे गाव आहे. जालगावातील ब्राह्मणवाडीतूनही
तेथे जाता येते. परंतु तेथून काही अंतर पायी उतरावे लागते. मराठी
साहित्यातील प्रसिध्द कवी कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसूत यांच्या
काव्यप्रतिभेची सुरूवात याच वळणे या गावातून झाली. त्यांचे जन्मगाव
रत्नागिरी जवळ मालगुंड असले तरी वळणे गावी त्यांचे काही काळ वास्तव्य
होते. शांत वाहणारी नदी आणि काजू, आंबा, माड, साग, अशा विविध
झाडांनी नटलेला आजूबाजूचा रम्य परिसर, केवडयाचे बन अशा सुंदर
सुगंधी वातावरणाचा परिणाम होऊन त्यांच्यातील काव्यप्रतिभा जागृत
झाली. त्यांचे वास्तव्य असलेले घर आजही पाहावयास मिळते. परंतु
ते अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत बाहे. तेथे त्यांचे स्मारक उभारण्यचा
प्रस्ताव विचारधिन आहे असे स्थानिक लोकांकडून समजते.
थोडेशा आजूबाजूला असलेल्या निसर्गाच्या कुशीतील या चिमुकल्या गावाला आवश्य भेट द्यावी.
सुगंधी केवडयाचा हिरवाकंच खोपा घालून झुळझूळ वाहणारी नदी, केवडयाचे घनदाट बन आणि
त्यात मुक्त विहार करणारे मोर या सगळया आठवणी मोरपिसासारख्याच जपून ठेवाव्यात अशा
आहेत.
क्वचित प्रसंगी केवडयाच्या बनात आपल्या चाहुलीने सावध होऊन आपल्या समोरून सळसळत
बिळात जाणारे 8-10 फुटी साप/नाग दिसू शकतात. ते दर्शन निस्तब्ध करणारे आणि खूपच
थरारक असते.
|